नगर – सत्तेचा व पदाचा गैरवापर
करून आ.शिवाजी कर्डिले यांनी प्रशासनाला
हाताशी धरून बुर्हाणनगर येथील विजय
भगत यांच्या मालकीच्या जागेतील अंबिका सांस्कुतिक
भवन गुरवारी सकाळी जमीनदोस्त केले. तुळजाभवानी
देवीच्या विविध उत्सवासाठी तसेच धार्मिक कार्यक्रम
ांसाठी या सांस्कृतिक भवनाचा वापर आम्ही करत असू.
तिथे रहिवासी खोल्याही होत्या. हे बांधकाम पूर्णपणे
कायदेशीर असून प्रशासनाच्या, ग्रामपंचायची परवानगी
यास आहे. आ.कर्डिले यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायत
व जिल्हा प्रशासनास ही बेकायदेशीर प्रशासनास ही
कारवाई करण्यास भाग पाडले आहे. यामध्ये आमचे
करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. आ.शिवाजी कर्डिले
हे गेल्या अनेक वर्षांपासून बुर्हाणनगरच्या तुळजाभवानी
देवी मंदिराचे पुजारी असलेल्या भगत कुटुंबियांना
मानसिक व राजकीय त्रास देत आहेत. त्यांच्या विरोधात
निवडणुकीत काम केल्यानेच आ.कर्डिले यांनी द्वेषाने
ही बेकायदेशीर कारवाई केली आहे. सत्तेचा व बळाचा
वापर करत ते दादागिरी करत आहेत. अनेकदा त्यांनी
आम्हाला जीवे मारण्याच्या धमयाही दिल्या आहेत.
त्यामुळे कदाचित ते आमचा संतोष देशमुख करतील,
असा गंभीर आरोप बुर्हाणनगर येथील तुळजाभवानी
देवी मंदिराचे पुजारी अॅड.अभिषेक भगत यांनी पत्रकार
परिषदेत केला.
अहिल्यानगर तालुयातील बुर्हाणनगर येथील भगत
कुटुंबियांच्या माकालीच्या जगात उभारण्यात आलेल्या
अंबिका सांस्कृतिक भवन उपविभागीय अधिकारी सुधीर
पाटील यांच्या आदेशाने प्राशासकीय यंत्राने मार्फत
गुरवारी सकाळी बुलढोझरच्या सहाय्यने जमीनदोस्त
करण्यात आले. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा
आरोप करत अॅड.विजय भगत, अभिषेक भगत यांनी
माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अंबडचे माजी आमदार
शिवाजी चोथे, माजी सभापती सुभाष झिने यांच्या
उपस्थितीत गुरवारी पत्रकार परिषद घेतली. हे प्रकरण
न्याय प्रविष्ट असताना जिल्हा प्रशासनाने कोणतीही पूर्व
नोटीस न देता बेकायदेशीरपणे ही कारवाई केल्याचा
आरोप अभिषेक भगत यांनी केला.
यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले,
आ.शिवाजी कर्डिले यांनी सत्तेचा वापर करून भगत
परिवारावर ही बेकायदेशीरपणे कारवाई केली आहे. देवीचे
पुजारी असलेल्या हिंदू समाजच्या परिवारावर अन्याय
करणे हेच का भाजपाचे हिंदुत्व? प्रत्यक्षात आ.कर्डिले
रहातात त्या घराचाही वरचा मजला बेकायदेशीर आहे.
मग प्रशासनाने अद्याप का नाही त्यांच्या घरावर कारवाई
केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात
भाजपाकडे असलेल्या पाशवी बहुमता मुळेच भाजपाचे
आमदार सर्वसामान्य व अल्पसंख्याक कुटुंबियांवर अशी
दादागिरी करत बेकायदेशीर कारवाई करत आहेत, असा
आरोप त्यांनी केला.
माजी आमदार शिवाजी चोथे म्हणाले,
आ.कर्डिले व भगत परीवारात बर्याच
वर्षांपासून वाद आहेत. ते समजुतीने सोडवण्यासाठी मी
मध्यस्थी केली. पण आ.कर्डिले ऐकायला तयार नाहीत
ते द्वेषाने राजकारण करत भगत कुटुंब उध्वस्त करण्यास
निघाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षाच्या
आमदारांचे असे घाणेरडे राजकारण दिसत नाही का ?
या विरोधात लवकरच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे.
यावेळी अभिषेक भगत यांनी २०१३ मध्ये सर्व रीतसर
परवानग्या घेऊनच अंबिका सांकृतिक भवन बांधले असल्याचे
सांगत पूर्णपणे कायदेशीरच आहे. जिल्हा प्रशासनाने
आ.कर्डिलेंच्या दबावामुळे केलेली कारवाई बेकायदेशीर आहे.
अंबिका सांस्कृतिक भवनात आमच्या अनेक महत्वाच्या
वस्तू होत्या. देवी देवतांचे फोटो व मुर्त्या होत्या. या वस्तू
व मुर्त्या काढण्याचाही अवधी प्रशासनाणे आम्हाला दिला
नसल्याने सर्व वस्तूंची मोडतोड व मूर्त्यांची विटंबना झाली
आहे. त्यामुळे आमचे दीड कोटीहून अधिक नुकसान झाले
आहे. अंबिका सांकृतिक भवनाच्या कारवाईची नोटीस
उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी १८ फेब्रुवारीलाच
काढली होती. पण अधिकार्यांनी ती नोटीस सांकृतिक भवन
पूर्णपणे पडून झाल्यावर गुरवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारस
आमच्याकडे आणून दिली. याचा अर्थ प्रशानाची हात मिळवणी
या प्रकरणात झाली आहे. या बेकायदेशीर कारवाई विरोधात
मी कोर्टात दाद मागणार असल्याचे अभिषेक भगत यांनी
सांगितल