जिवंत सोडतील का?

0
100

कोल्ह्याची थाप

जिवंत सोडतील का?

का उगीच मला संकटात लोटतोस? संकटात सापडण्यापेक्षा मी येथेच सुरक्षित आहे.” त्यावर कोल्हा म्हणाला, “अरे तुला भितीचे कसलेही कारण नाही. प्राणी आणि पक्षी यांच्यामध्ये तसा करार झाला आहे. जो कोणी कराराविरुद्ध वागेल, त्याला कडक शिक्षा होईल, असाही ठराव झाला आहे. ही गोष्ट तर सर्वांना समजली. मग तुलाच कशी कळली नाही?” असे दोघांचे बोलणे चालू असता मध्येच कोंबडा वाकडी मान करुन दूरवर पाहू लागला असता कोल्हा म्हणाला,” मित्रा, वाकडी मान करुन दूरवर काय बघतो आहेस? त्यावर कोंबडा म्हणाला, ”अरे भाऊ, तिकडून चार-पाच शिकारी कुत्रे इकडेच येताहेत, असे मला दिसते आहे.” कोंबड्याचे हे बोलणे ऐकताच कोल्ह्याची पाचावर धारण बसली. मनात घाबरुन तो म्हणाला,” अरे मित्रा, असे आहे तर मला येथून गेले पाहिजे. बरं, नमस्कार. हा मी निघालोच बघ. तेव्हा कोंबडा त्याला थांबवीत म्हणाला, “अरे भाऊ, असे पळतोस कशाला? थोड्या वेळातच मी खाली उतरतो. तू मला कराराची जी गोष्ट सांगितलीस, ती जर खरी असेल, तर तुला भीती वाटण्याचे काही कारण नाही.” त्यावर कोल्हा म्हणाला,” नाही रे बाबा. असा करार झाला आहे हे जरी खरे असले, तरी तो कुत्र्यांना अजून समजला नसेल, तर ते मला ठार केल्याशिवाय सोडतील का?” असे म्हणत कोल्ह्याने तेथून पोबारा केला. तात्पर्य : शेरास सव्वाशेर भेटतो, हेच खरे.