पाण्याच्या साहाय्याने शरीरातील पाचन
व शोषणाची क्रिया होते. आतील कोठ्याची
स्वच्छता होते. मळ बाहेर निघतो. रक्त
पातळ राहते. रसोत्पादक ग्रंथी पाण्याच्याच
मदतीने आपले कार्य करतात. अशा प्रकारे
पिण्याच्या पाण्याचा आरोग्याशी फार महत्त्वाचा
संबंध आहे. साधारणपणे दिवसा रात्रीतून
तहान लागेल तेव्हा पाणी प्यावे. जेव्हा खूप
भूक लागली असेल तेव्हा पाणी पिऊ नये,
भोजन करताना मध्ये थोडेच पाणी प्यावे.
भोजनानंतर, एकदोन तासांनी जेव्हा तहान
लागते तेव्हा यथेच्छ पाणी प्यावे. नेहमी पाणी
घोट घोट असे हळूहळू शांत चित्ताने प्यावे.
त्यामुळे पाण्याबरोबर तोंडातील लाळ मिसळून
ते पाचक स्वादिष्ट होते व त्याने तहान पूर्णपणे
भागते.