महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन बांधकाम व्यावसायिकांची ओढ्या, नाल्यांवर अतिक्रमणे

0
28

पावसाळ्यापुर्वीच्या उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार : बजरंग दलाचा आयुताना निवेदनाद्वारे इशारा

नगर – बांधकाम व्यावसायिकांनी अधिकार्‍यांशी संगनमत करुन अतिक्रमणे केल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसते तुम्ही महापालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे, नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून पावसाळ्यापुर्वी उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दलाचे जिल्हा संयोजक कुणाला भंडारी यांनी दिला आहे. याबाबत मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थोड्याच दिवसात पावसाळा सुरु होत असून महानगरपालिका हद्दीतील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे बुजवणे, पथदिव्यांची दुरुस्ती करणे, पावसाळी गटार स्वच्छ करणे या सर्व उपाययोजना शहरामध्ये अद्यापही झालेल्या नाहीत. पावसाळा सुरु होत असून शहरामध्ये जे उपनगरातील नैसर्गिक ओढ्या नाल्यांवर अतिक्रमण करुन ते बुजवुन त्यावर बांधकाम व्यवसायिकांनी पालिकेच्या अधिकार्‍यांशी संगनमत करुन बांधकाम करुन अतिक्रमण केल्याने उपनगरातील रहिवाश्यांच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे प्रकार काही वर्षांपासुन वाढत आहे. यंदाच्या पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसुन मोठे नुकसान होण्याची दाट शयता आहे व नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शयता आहे.

बर्‍याच ठिकाणचे पथदिवे हे बंद असून यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून अनेक ठिकाणी आत्ताच तयार केलेल्या नवीन रस्त्यांवर खड्डे झालेले आहेत. त्यामध्ये पाणी साचुन अपघात होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहने खड्ड्यात जाऊन पाणी उडल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रकारचे वादविवाद होतात. त्यामुळे सामाजिक शांततेचा प्रश्न निर्माण होतो. या साचलेल्या पाण्यांमध्ये डासांचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे डेंगु, मलेरिया चिकन गुणिया सारखे गंभीर आजार पसरण्याची दाट शयता आहे. शहरातील प्रभाग अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य विभाग अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती प्रसिध्द करावी. पावसाळ्यापुर्वीच्या सर्व उपाययोजना त्वरीत पुर्ण करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुणाल भंडारी यांनी दिला आहे.