मतदान जागृतीसाठी तृतीयपंथीयांचाही पुढाकार; १०० टक्के मतदान करण्याचे केले आवाहन

0
27

नगर : अहमदनगर महापालिकेच्या वतीने लोकसभा निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठक घेत विविध संघटनांशी चर्चा केली व मतदानाचा टक्का वाढवावा, शहरातील तृतीय पंथीयांना १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले, यावेळी काजलगुरु यांनी लोकसभा निवडणूकीसाठी मतदान करणार असे आश्वासन दिले व काजलगुरु आणि त्यांचे सहकारी यांनी १००% मतदान करण्याची शपथ घेतली .यावेळी उपायुक्त विजयकुमार मुंढे,सहायक आयुक्त सपना वासवा, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजन, सुनील खलचे, किरण उजागरे व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आम्ही कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याबाबत सर्वांनी सामूहिक शपथ घेतली.संकल्प कलश उपक्रमाची यावेळी सुरवात करण्यात आली. शहरात मनपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत मतदानासाठी जनजागृती करण्यात येत आहे, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडण्यासाठी सर्वानी मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या पर्वात सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.