संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी बावीस आरोपी दोषी

0
54

नगर – संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात सर्वच्या सर्व आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या आरोपींमध्ये चेअरमन ज्ञानदेव वाफारे, व्हा.चेअरमन यांच्यासह संचालक मंडळाचा समावेश असून आरोपींच्या शिक्षेवर सोमवारी (दि.८) सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी वकील अनिल ढगे यांनी दिली. संपदा पतसंस्थेत सुमारे १३ कोटी ३८ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात संचालक मंडळ व अधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये १ ज्ञानदेव सबाजी वाफारे, २ सुजाता ज्ञानदेव वाफारे, ३ सुधाकर परशुराम थोरात, ४ भाउसाहेब कुशाबा झावरे, ५ उत्तमराव होते. देणेबाबतची सुनावणी ८ एप्रिल २०२४ रोजी न्यायालयात ठेवलेली आहे. सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने अनिल ढगे हे काम पाहत असून त्यांना अवसायक मंडळाच्यावतीने अ‍ॅड. सुरेश लगड व ठेवीदारांच्यावतीने अ‍ॅड. अनिता दिघे या सहाय्य करत आहेत. सदर सत्र खटल्यामधील लेखा परिक्षक देवराम मारूतराव दगडू चेमटे, ६ दिनकर बाबाजी ठुबे, ७ विष्णूपंत गणपत व्यवहारे, ८ राजे हसन अमीर, ९ बबन देवराम झावरे, १० लहू सयाजी घंगाळे, ११ हरिश्चंद्र सावळेराम लोंढे, १२ रविंद्र विश्वनाथ शिंदे, १३ साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर, १४ संजय चंपालाल बोरा, १५ अनुप प्रविण पारेख, १६ मारूती खंडू रोहोकले, १७ चिमाजी खंडू रोहोकले, १८ बबन खंडू रोहोकले, १९ सुधाकर गोपीनाथ सुंबे, २० गोपीनाथ शंकर सुंबे, २१ महेश बबन झावरे व २२ संगिता हरिश्चंद्र लोंढे यांचा समावेश आहे. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर एन. आर. नाईकवाडे यांनी संपदा पतसंस्थेच्या झालेल्या अपहार रक्कम रू.१३,३८,५५,६६७ प्रकरणी वेगवेगळया कलमांखाली दोषी धरलेले आहे. आरोपींना शिक्षा बारसकर यांनी वरील आरोपींविरूध्द ०१/०८/२०११ रोजी कोतवाली पोलिस स्टेशन अहमदनगर येथे फिर्याद दिली होती. फिर्यादीमध्ये विनातारण कर्ज कर्जदारांना वाटप करण्यात आलेले होते व ते नियमबाहय देण्यात आलेले होते. तसेच सोने तारण कर्ज हेही नियमबाहय देण्यात आले होते. तसेच तत्कालीन संचालक मंडळाचे नातेवाईक व कर्मचारी यांनाही बेकायदेशीररित्या कर्ज वाटप करण्यात आलेले सदर आरोपींनी सदर रक्कमेचा अपहार करून रक्कम स्वत:चे फायद्याकरिता वापरली होती. तसेच रकमेबाबत खोटया नोंदी करून सभासदास चुकीची माहिती देवून कायदेशिररित्या आर्थिक संस्था चालविताना ठेवीदाराच्या ठेवीचा विनीयोग बेकायदेशिरपणे अटी व नियम यांचे पालन न करता सभासदांच्या ठेवी परत करण्यास असमर्थता दर्शविली व ठेवीदारांचे रकमेची अफरातफर करून फसवणूक एकुण रक्कम रू. १३,३८,५५,६६७ केली म्हणून फिर्यादी यांनी आरोपी विरूध्द भा.द.वि. कलम १७७, ४०९, ४१७, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) व महाराष्ट्र ठेविदारांचे हितसंरक्षण कायदा १९९९ चे कलम ३ प्रमाणे फिर्याद दिलेली होती. सदर खटल्यांचे कामकाज व अंतिम युक्तीवाद होवून आरोपींना न्यायालयाने दोषी धरलेले आहे.