न्याय्य हक्काच्या मागणीसाठी ३१ मार्चला मढी येथे वैदू समाजाचा ‘परिवर्तन’ मेळावा

0
25

जामखेड – वैदू समाज आपल्या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी पाथर्डी तालुयातील मढी येथे कानिफनाथ तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ३१ मार्च रोजी परिवर्तन मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणावरुन बांधव उपस्थित राहून संघटीत होणार आहेत. संसदेच्या आगामी अधिवेशनात राज्य आणि केंद्राने वैदू समाजाच्या विशेष मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी वटहुकूम काढावा तसेच इतर मागण्यांसंदर्भात निर्णय होऊन जिल्हा व तालुका पातळीवरील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याने परिवर्तन मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्ते व समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मढी मेळावा नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण यांनी केले आहे. मढी नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, वैदु समाज पोटासाठी भटकंती करत असतो. त्यांच्या असणार्‍या न्याय्य मागण्यांमध्ये वैदु समाज स्वतंत्र अर्थिक विकास महामंडळ करण्यात यावे, वैदु भवनासाठी, तिर्थक्षेत्र मढी, जेजूरी, माळेगाव, राजे देऊळगाव, याठिकाणी वैदू भवनासाठी जागा मिळावी, अ‍ॅट्रासिटी सारखे कवच वैदु समाजासाठी संरक्षण मिळावे, जातीचे दाखले मिळवण्यासाठी १९६१ कायदा शिथिल करून, घरपोहच दाखले मिळावेत, गृहचौकशी करून जातपडताळणी दाखला मिळावा, नॉनक्रिमिनल दाखल्याची अट रद्द करावी, वैदु समाज रोजगारासाठी गावोगाव फिरतात, त्यांना तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र देण्यात यावे, भूमिहीन लोकांना प्रत्येकी २ हेटर प्रमाणे व शासकीय जागा अतिक्रमित असेल तर कायम स्वरूपी करण्यात यावे, प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहमध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे, समाजातील शिक्षित, अर्धशिक्षित, अकुशल धारकांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्राधान्य द्यावे, यशवंतराव चव्हाण, मुक्त वसाहत, तांडा योजने अंतर्गत, वैदु समाजात शहरी तसेच ग्रामिण भागात घरकूल योजना देण्यात यावे, रोहिनी कमिशनच्या निर्देशानुसार वैदू समाजाला अवलंबीनात यावे, त्यानुसार सब कॅटेगिरी करण्यात यावे, पुढीलप्रमाणे वैदु समाजाला केंद्रामध्ये अत्यंत मागासलेल्या वर्गात समाविष्ठ करण्यात यावे अशा विविध मागण्यांचा या परिवर्तन मेळाव्यात मांडल्या जाणार आहेत.

अन्यथा संपूर्ण भारतातील वैदू समाज आंदोलन करणार वैदू समाजाला न्याय मिळावा म्हणून केंद्र व राज्य सरकारने दखल घेऊन संसदेत व विधीमंडळात मागण्या संमत करून वटहुकूम काढावा अन्यथा संपूर्ण भारतातील वैदू समाज एक होऊन आपल्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी आपल्या न्याय्य हक्कासाठी प्रत्येक तालुयातून जिल्ह्यातून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व समाज संघटना एकत्रित करून हा लढा जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही. मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आहे. तरी संपूर्ण भारतातील वैदू समाजाने लाखोंच्या संख्येने मढी या ठिकाणी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन लेखक बाबा चव्हाण यांनी केले आहे. मढी नियोजन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष लेखक बाबा चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, वैदु समाज पोटासाठी भटकंती करत असतो. त्यांच्या असणार्‍या न्याय मागण्यांमध्ये वैदु समाज स्वतंत्र अर्थिक विकास महामंडळ करण्यात यावे, वैदु भवनासाठी, तिर्थक्षेत्र मढी, जेजूरी, माळेगाव, राजे देऊळगाव, याठिकाणी वैदू भवनासाठी जागा मिळावी, अँट्रासिटी सारखे कवच वैदु ’समाजासाठी संरक्षण मिळावे, जातीचे दाखले मिळवण्यासाठी १९६१ कायदा शितिल करून, घरपोहच दाखले मिळावेत, गृहचौकशी करून जातपडताळणी दाखला मिळावा, नॉनक्रिमिनल दाखल्याची अट रद्द करावी, वैदु सम ाज रोजगारासाठी गावोगाव फिरतात, त्यांना तहसीलदार यांच्याकडून ओळखपत्र देण्यात यावे, भूमिहीन लोकांना प्रत्येकी २ हेटर प्रमाणे व शासकीय जागा अतिक्रमित असेल तर कायम स्वरूपी करण्यात यावे, प्रत्येक जिल्हयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहमध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे. समाजातील शिक्षित, अर्धशिक्षित, अकुशल धारकांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्राधान्य द्यावे, यशवंतराव चव्हाण, मुक्त वसाहत, तांडा योजने अंतर्गत, वैदु समाजात शहरी तसेच ग्रामीण भागात घरकूल योजना देण्यात यावे, रोहिनी कमिशनच्या निर्देशानुसार वैदू समाजाला अवलंबीनात यावे, त्यानुसार सब कॅटेगिरी करण्यात यावे, पुढील प्रमाणे वैदु समाजाला केंद्रामध्ये अत्यंत मागासलेल्या वर्गात समाविष्ठ करण्यात यावे अशा विविध मागण्यांचा या परिवर्तन मेळाव्यात मांडल्या जाणार आहेत. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र वैदू समाज संघटना कार्याध्यक्ष नारायण शिंदे, नियोजन मढीचे अध्यक्ष बापू चव्हाण, खजिनदार राहुल शिंदे, संजय शिंदे, संजय लोखंडे, संजय धनगर, श्याम शिंदे, तायगा लोखंडे, राज्य प्रदेशाध्यक्ष नागेश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास आ. राम शिंदे, गोपींचद पडळकर, आ. संग्राम जगताप हे उपस्थित राहणार आहेत.