जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये

0
40

जेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून
चूळ भरतो त्याला आपण गुळण्या करणे
म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही
स्वस्थ राहते. शास्त्रानुसार गुळण्या १६ वेळा
करण्याची पद्धत आहे. आपण १० ते १५ वेळा
गुळण्या केल्या म्हणजे कोपर्‍यात अडकलेले
कण बाहेर पडतात व तोंडाला दुर्गंधी येत
नाही. जेवणादरम्यान आपल्या शरीरात उष्णता
निर्माण होते. गुळण्या केल्याने व डोळ्यांना
पाणी लावल्याने उष्णता शांत होते. जेवणानंतर
लगेच पाणी पिऊ नये. कमीत कमी अर्ध्या
तासाने पाणी प्यावे. पचनक्रिया व्यवस्थित
होते.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर