निवडणूक काळात सोशल मिडीयावर सायबर पोलिसांचा राहणार ‘वॉच’; अफवा पसरविणारे, बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर होणार कारवाई

0
42

नगर – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असून या काळात सोशल मिडीयावर सायबर पोलिसांचा ’वॉच’ राहणार आहे. अफवा पसरविणारे, बदनामीकारक पोस्ट करणारे दोन समाजात / गटात तेढ निर्माण करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिला आहे. याबाबत पो.नि. आहेर यांनी म्हंटले आहे की, लोकसभा निवडणुक कालावधीमध्ये उमेदवारांचे प्रचारा दरम्यान सोशल मिडिया व्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच इलेट्रॉनिक व सोशल मिडिया व्दारे प्रसारित होणार्‍या फेक न्युज प्रसारीत करणे कायदयाने गुन्हा असुन अशा प्रकारचे संदेश व अफवा पसरवुन दोन समाजात गटात तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर यांचेकडुन सोशल मिडिया वर वॉच राहणार असुन अफवा पसरविणारे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लोकसभा निवडणुक ही शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे सोशल मिडिया व्दारे बदनामी करणे, अफवा पसरविणे, व्देषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच इलेट्रॉनिक व सोशल मिडिया व्दारे प्रसारित होणार्‍या फेक न्युज संदर्भात तक्रार देण्याकरिता अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडुन ९१५६४३८०८८ हा मोबाईल क्रमांक प्रसारीत करण्यात येत असुन सदरच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉटसअ‍ॅप सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी आपल्या वरिल तक्रारी नमुद मोबाईल क्रमांक यावर कराव्यात, प्राप्त तक्रारीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.असेही पो.नि. आहेर यांनी म्हंटले आहे.