LATEST ARTICLES

नगर शहरासह तालुक्यात बिंगो जुगार जोरात; कारवाई करा अन्यथा ६ डिसेंबरपासून उपोषण

  नगर – युवा पिढीला उध्वस्त करणार्‍या बिंगो जुगारवर जिल्ह्यात पोलीसांनी तात्काळ बंदी घालून कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष गुलाम अली शेख यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे. अहमदनगर जिल्ह्यात बिंगो जुगार जोमात सुरू आहे. ऑनलाइन बिंगोमुळेच अनेक लोकांचे संसार उद२ध्वस्त होत असून, युवा वर्ग जुगार व व्यसनाच्या आहारी जात आहे. बिंगो जुगारवर बंदी असताना देखील त्यावर कारवाई होत नाही. पोलीस प्रशासन कोणाच्या आशीर्वादाने बिंगो चालकांना अभय देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. जिल्ह्यात शहरात व तालुयात मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या बिंगो जुगारवर कारवाई करुन ते कायमचे बंद होण्यासाठी पोलीस प्रशासनाने भूमिका घेण्याची मागणी रिपाई अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा ६ डिसेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून पळविले

बालिकाश्रम रस्त्यावरील घटना; २ अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल   नगर – विडी कामगार महिलेच्या गळ्यातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दुचाकीवरील दोघांनी ओरबाडले. शुक्रवारी (दि. १) सकाळी साडे दहाच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावरील जय शंकर मेन्स वेअरच्या समोर ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. शारदा रघुनाथ गाजुल (वय ६७ रा. जाधव मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांच्या घरीच बिड्या बनविण्याचे काम करतात. त्यांनी बनविलेल्या बिड्या नवरंग व्यायामशाळा, तोफखाना येथे असलेल्या कंपनीमध्ये पोहच करण्यासाठी त्या शुक्रवारी सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. बिड्या कंपनीत पोहच केल्यानंतर त्या बालिकाश्रम रस्त्यावरून घरी जात असताना जय शंकर मेन्स वेअरच्या समोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडले. यामध्ये अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण, एक तोळ्याची सोन्याची चेन असा एक लाख पाच हजार रुपये किमतीचे साडे तीन तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. दागिने चोरणार्‍या चोरट्यांनी फिर्यादीला जोराचा ध क्का दिल्याने त्या खाली कोसळल्या. त्यानंतर चोरटे साताळकर हॉस्पिटलच्या दिशेने पसार झाले. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने घटनास्थळी गर्दी जमा झाली. त्यातील एका तरुणाने चोरट्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला असता ते तोपयरत पसार झाले घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून बालिकाश्रम रस्त्यावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  

श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी

  महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१८ साली काढलेल्या परिपत्रकानुसार राष्ट्रीयपुरुष, थोर व्येी यांच्या जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करणे या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.२२१८/ प्र.क्र.१९५/२९ दि.२६/१२/२०१८ संदर्भानुसार श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबरला साजरी करण्याचा आदेश काढण्यात आला आहे, त्याचे पालन व्हावे. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी नगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी, असे आवाहन नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच शैक्षणिक संस्था श्री संत संतांजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी आधिकृत फोटोचा वापर करण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. सदर फोटो फ्रेम मिळण्यासाठी श्री संताजी फ्रेम वर्क, परसराम सैंदर, शिंपीगल्ली, तेलीखुंट, नगर. श्री दत्त फ्रेमिंग वर्स, बाळासाहेब देशपांडे दवाखान्यासमोर, नगर. ओंकार सुपर स्टोअर्स, महाजनगल्ली, नगर किंवा अधिक माहितीसाठी हरिभाऊ डोळसे (मो.९८२२२७१८०७) यांच्याशी संपर्क साधावा.  

दादरचे नामांतर चैत्यभूमी करा अन्यथा ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करणार

नगर – मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. तर या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर ५ डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, विजय शिरसाठ, नईम शेख, अजीम खान, आदिल शेख, सुधीर गायकवाड, हुसेन चौधरी, निशांत शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ असलेले दादर (मुंबई) येथील चैत्यभूमी समस्त आंबेडकर समाजाचे ऊर्जा स्थान आहे.देशातील समस्त आंबेडकरी जनता व बौध्द अनुयायांचे हे एक श्रध्दास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी या चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या स्मारक स्थळाला महाराष्ट्र शासनाने अ वर्ग पर्यटन स्थळ व तीर्थस्थळाचा दर्जा २ डिसेंबर २०१६ रोजी दिला आहे. दादर परिसर चैत्यभूमीच्या नावाने ओळखला जात असून, दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची संपूर्ण आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या नामांतरासाठी अनेकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकत्यारनी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी व मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. जो नामांतर होत नाही, तोपयरत उपोषण सुरु राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

निविदा मंजूर, निधीही उपलब्ध तरीही रस्त्याचे काम रखडले; काम सुरू करा अन्यथा बांधकाम विभागासमोर ‘आंदोलन’

  नगर – नगर तालुयातील टाकळी काझी ते भातोडी गाव दरम्यान साधारण ८ किलोमीटर एवढे रस्त्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहे. सदर रस्त्यासाठी शासनाने मागील वषारमध्ये ४ कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला व रस्त्याची निविदा होऊन जवळपास आजपयरत १० महिने एवढा कालावधी झालेला आहे. वर्षभरापूर्वी निविदा होऊन निधी येऊन ठेकेदार नेमून देखील रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत असल्याच्या निषेधार्थ जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता संजय भावसार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, उपाध्यक्ष दीपक गुगळे, सचिव अमित गांधी, शहर अध्यक्ष शहानवाज शेख, ऋषिकेश पवार आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी व वेळ काढून पणामुळे निधी मंजूर असतानाही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. गावातली सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून दळणवळण करताना अनेक खड२ड्यांचा सामना करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी वर्षभरापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे नागरिकांना आश्वासन दिले होते. मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामूळे आजपयरत अनेक निष्पाप नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड२ड्यांमुळे अपघात होऊन आपला जीव गमावलेला आहे. त्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी रस्त्याची पाहणी करावी तसेच येणार्‍या १५ दिवसाच्या आत रस्त्याचे काम करावे अन्यथा १६ व्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  

व्यावसायिकाला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने मारहाण

नगर – व्यावसायिकाला दोन अनोळखी इसमांनी लाकडी दांडयाने मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. २९) रात्री साडे नऊच्या सुमारास नगर- मनमाड रस्त्यावरील बोल्हेगाव ब्रिज जवळ घडली. शिवम राजेंद्र उदारे (वय २१ रा. केदारे मंगल कार्यालयाशेजारी, भिंगार) असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास बोल्हेगाव येथील राजयोग इलेटि ्रक दुकानातून नगर-मनमाड रस्त्याने घरी जात असताना त्यांना ब्रिज जवळ विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडविले. त्या इसमांनी तोंडाला रूमाल बांधलेले होते. दुचाकीवरील मागे बसलेल्या इसमाने फिर्यादीची कॉलर पकडली तर मागे बसलेल्या इसमाने लाकडी दांडयाने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मारहाण करणारे दोघे अनोळखी त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले. फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार नेहुल करीत आहेत.  

मुदत संपूनही केडगावमधील विकासकामे अपूर्णच राहिल्याने अखेर वकिलानेच बजावली प्रशासकिय यंत्रणेला ‘नोटिस’

  नगर – सा.बां.विभाग महाराष्ट ्र शासनाचे शासन निर्णय नुसार नगर तालुयातील रामा ५८ ते खारे कर्जुने-हिंगणगाव-निमगाव वाघा-केडगाव- बुरुडगाव-वाकोडी-वाळुंज ते रामा५८ (प्रजिमा- १७०) रस्त्यावर कि.मी.१५/२०० मध्ये लहान पुलाचे व जोड रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी २कोटी अंदाजीत खर्चाचे बांधकामास मान्यता देण्यात आलेली होती. त्यानुसार केडगाव वेस ते देवी रोडवर मतकर वस्ती लगत नवीन बांधकाम करणे व पोच मार्गाचे खडीकरण,मजबुतीकरण, डांबरीकरण,मुरुम बाजुपट्टी, कच्चे गटर्सचे काम प्रस्तावित करण्यात आलेले होते. त्यासाठी तांत्रिक मान्यता र क्कम रु.१,६५,४६,३७६/- चा निधी मंजुर करण्यात आला होता. तदनंतर कार्यकारी अभियंता अहमदनगर सा.बा.विभाग यांचे कार्यालयाकडून१४/१०/२०२१ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला होता सदरील आदेशान्वये काम सुरु करण्यात आलेले होते.कार्यारंभ आदेशानुसार कामाची मुदत ही १२ महिन्यांची होती. त्यानुसार १४/१०/२०२२ रोजीच कामाची मुदत संपलेली आहे. तरी देखील काम आजही अपुर्णच आहे. अपुर्ण असल्यामुळे त्या रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या नागरीकांना वर्षभरापासुन प्रचंड धुळीचा त्रास होत आहे. सा.बा.विभागातील ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर नमुद काम पुर्ण करुन घेण्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते सर्वजण आपल्या कर्तव्यात कसुर करीत आहेत. सदर कामाच्या बदल्यात १,२१,९४,९४३/- इतया रकमेचे काम अपुर्ण असतानाही बिल अदा करण्यात आलेले आहे. त्यामुळे अ‍ॅड.वैभव कदम यांनी जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता सा.बां.मंडळ, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग यांना कायदेशीर नोटीस पाठवून सदरचे अपूर्ण काम तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचे नोटिसीत नमूद केले आहे.  

अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ७७६ रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचे पुरावे विश्वास नांगरे यांच्याकडे सादर

  नगर-अहमदनगर मनपा क्षेत्रातील सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचे बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ऑनलाईन तक्रार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी मुंबई येथे नांगरे यांची काळे यांनी समक्ष भेट घेत सुमारे पंचवीस मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी पुरावे देखील सादर केले. भ्रष्टाचाराची मोठी व्याप्ती लक्षात घेता जलद गतीने याबाबत पुढील कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केल्याची माहिती मुंबईतून दिली. वरळी येथील कार्यालयात यावर तपशीलवार चर्चा झाल्याचे काळे यांनी सांगितले. यावेळी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे उपस्थित होते. काळे म्हणाले, नगर शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेला निकृष्ट कामे कारणीभूत आहेत. अधिकारी, ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे मनपातील काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी यांनी संगनमत करून बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र जोडून त्या आधारे खोटी कागदपत्र तयार करून नगर शहराला खड२ड्यात घालत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यामुळे सर्वसामान्य नगरकर मात्र जीव मुठीत धरत रोज खड२ड्यांमधून प्रवास करत आहेत. शहरात रस्ते नावाला सुद्धा उरलेले नाहीत. अनेकांना यामुळे अनेक आजार जडले. नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. या सगळ्याचे मूळ हे शहरातील ७७६ रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार यामध्ये दडलेले आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या चौकशी अहवालामध्ये बनावट गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र ते होऊन देखील मनपा प्रशासन राष्ट ्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित असणार्‍या ठेकेदारांना आणि अधिकार्‍यांना वाचविण्यासाठी भ्रष्टाचार दडपत त्यांना पाठीशी घालत आहेत. नगर शहरामध्ये चांगले रस्ते नागरिकांना मिळायचे असतील तर अशा प्रकारे भ्रष्टाचार करणारे अधिकारी, ठेकेदार यांना तपास झाल्यानंतर निश्चितपणे बेड्या पडतील. त्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल असा विश्वास काळे यांनी नांगरे पाटील यांच्या भेटीनंतर व्ये केला आहे. पुढील आठवड्यात एसपी घारगे, एसपी राकेश ओलांची भेट घेणार विश्वास नांगरे पाटील यांनी अँटी करप्शन नाशिक परीक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर – घारगे यांना याबाबत तात्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दूरध्वनीद्वारे दिले आहेत. काळे यांनी देखील याबाबत दूरध्वनीवरून घारगे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. बाजार पेठेतील परवाना शुल्क वाढीच्या विरोधासाठीचे दोन दिवसीय धरणे आंदोलन झाल्यानंतर पुढील आठवड्यात घारगे यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेऊन पुरावे सादर करणार आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलांकडे देखिल शासनाच्या आस्थापनेच्या नावे बनावट शि क्के, लेटर हेड, दस्तऐवज तयार केल्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.  

गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपीवर ‘प्राणघातक हल्ला’

  नगर- नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर झालेल्या ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील फरार आरोपी बबलू सरोदे याच्यावर शनिवारी (दि.२) सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी त्याला सावेडी नाका येथून उचलून जबर मारहाण करत माळीवाडा येथील फुलसौंदर चौकात आणून टाकले. या हल्ल्यात सरोदे याचा पाय फ्रॅचर झाला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ओंकार उर्फ गामा भागानगरे याचा २० जूनला पहाटे १ वाजण्याच्या सुमारास तलवारीने वार करत खून करण्यात आला होता. या खुनी हल्ल्यातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे, नंदू बोराटे यांच्यासह संदिप गुडा, रवी अप्पासाहेब नामदे, वैभव बबन हुच्चे, सागर प्रवीण गुडा, अनिकेत सोळंके या आरोपींना यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे. यातील बबलू सरोदे हा तेव्हापासून फरार होता. तो इतक्या दिवस पुणे, मुंबई येथे राहत होता. त्याची बहिण उपनगरात राहत असल्याने तिच्या घरी जाण्यासाठी तो शनिवारी (दि.२) सकाळी १० च्या सुमारास सावेडी नाका परिसरात उतरला. त्याला तेथे काही जणांनी पकडले व उचलून बालिकाश्रम रोडमार्गे लाकडी दांडयाने बेदम मारहाण करत या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गणेश हुच्चे याच्या माळीवाडा परिसरातील फुलसौंदर चौकात असलेल्या हॉटेलसमोर आणून टाकले. या घटनेची माहिती मिळताच कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माळीवाडा येथे दाखल झाले. पोलिसांनी जखमी सरोदे याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात सरोदे याचा पाय फ्रॅचर झाला असून शरीरावर अन्य ठिकाणीही मुकामार लागलेला आहे. या हल्लेखोरांची नावे बबलू सरोदे याने पोलिसांना सांगितली असून, त्याच्यावर उपचार सुरु असल्याने त्याचा सविस्तर जबाब नोंदवून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी सांगितले.

पाककला

0
  रताळ्याचा राजस पाक साहित्य : दीड किलो रताळी, दोन नारळांचा चव, सहा-सात वाट्या साखर, पाव किलो खवा, ट्रुटी-फ्रुटी, आवडीनुसार सुकामेवा, रताळी परतण्याइतपत साजूक तूप, दोन वाट्या दूध. कृती : रताळी स्वच्छ धुऊन, सालं काढून टाकावीत, किसणीवर किसून घ्यावीत. साजूक तुपावर कीस चांगला परतावा. नंतर नारळाचा चव घालून परतावा. नंतर खवा घालून परतावा. साखर+दूध घालून पुन्हा परतावा आणि हलव्याइतपत घट्ट झाल्यावर खाली उतरवावा. खाली उतरवून त्यात आवडीनुसार काजू, बदाम, टुटीफ्रुटी घालून सजवा. जास्त गोड हवं असल्यास साखर जास्त घालावी. मात्र रताळ्यालाही अंगची गोडी असते हे लक्षात घेऊन साखरेचं प्रमाण ठरवावं.