सत्यमेव जयतेच्या नावाखाली चाललेल्या गैर आणी बेकायदेशीर कारभाराच्या निषेधार्थ केडगाव मध्ये १८ फेब्रुवारीला निषेध सभा

0
113

नगर – सत्यमेव जयतेच्या नावाखाली राज्यात आणि देशात चाललेल्या गैर आणी बेकायदेशीर कारभाराच्या निषेधार्थ अरुणोदय क्रांती सेवा संघाच्या वतीने केडगाव उपनगरात विठ्ठल पार्क, श्रीकृष्ण नगर मध्ये १८ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे.

अरुणोदय क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण खिची यांनी यासंदर्भात म्हंटले आहे की, सन १९४७ पासुन या लोकशाहीतील कायदा व सुव्यवस्था चालविण्याचे कायदेशीर अधिकार तसेच लोकांमध्ये योग्य रित्या राबविण्यासाठी ज्या चार स्तंभाची स्थापना झाली विधायिका,न्यायपालिका, कार्यपालिका व पत्रकारिकता या चार स्तंभाची ब्रिदवाक्ये – सत्यमेव जयते, सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय १०० अपराधी हे निर्दोष सुटले तरी चालेल पण एका निर्दोष व्यक्तीस शिक्षा होता कामा नये, निस्पक्ष व निर्भिडता अशी ७६ व्या वर्षाच्या कालावधित जशीच तशी चालविली जात आहे.

वास्तविक पहाता गत २० वर्षातील लोकशाहीत एक ना धड भाराभार चिंध्या अशी परिस्थिती निर्माण केली अथवा घडविण्याचे कार्य सुरु झाले.कोणालाच कोणाचा ताळमेळ राहीलेला नाही स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार घडण्याचे प्रमाण वाढले निती भ्रष्टांनी काहुर माजविला. प्रस्थापीत ब्रिदवाक्ये ही वेशीला टांगलेल्या फलका प्रमाणे या चारस्तभांच्या प्रमुख कार्यालयात दिसुन आली. संविधानिक घटना त्यामधील नागरिकांची हक्क कर्तव्ये ही बासनात गुंडाळुन ठेवली कि काय ? अशी सद्याच्या परिस्थितीची खरी हकिगत आहे.

२६ जानेवारी १९५० या गणराज्य या दिनापासुन भारतीय लोकशाहीचे प्रमुख ब्रिदवाक्य सत्यमेव जयते हे अंमलात आले आज हि तेच ब्रिदवाक्य आहे. का आहे कशासाठी आहे याचे भान उरले तर नाहीच शिवाय गांभिर्य नसल्याचे बाब गेल्या २४ वर्षापासुन निदर्शनास आली. या भारत देशाचा पुर्वोतिहास पहाता नेहमी नितीचा सत्याचा विजय हा होतो आणी या लोकशाहीचे मुख्य ब्रिद सत्यमेव जयते हेच आहे तर यदाकदाचित कायद्यामध्ये सत्यता, सभ्यता, नितीमत्ता हि असेल असा आत्मविश्वास बाळगून गेल्या ३० वर्षात स्वकिय नातेवाईकांकडुन मानसिक,आर्थिक त्रास वअन्याया विरुध्द सत्य मार्गानेच दाद मिळविण्याचा धैर्य निश्चित केला परंतु परिस्थिती ही तशी विपरित होती तरी कोणावर अन्याय करायचा नाही होणारा अन्याय हा सुध्दा सहन करायचा नाही. हा सिध्दांत कायम बाळगूण दहा वर्ष तक्रारी केल्या तरी योग्य ती चौकशी झाली नाही म्हणून डिसेंबर २०१० मध्ये सत्याचा विजय करण्यासाठी कायदा हातात घेण्याचे तसे पत्र दिले आणी सन २०११ पासुन वाढत्या भ्रष्टाचारा विरुध्द जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे जनआंदोलन “सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नही” अशी घोषणा देण्यात आली.

येथील जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधिक्षक, तसेच मुख्यमंत्री. गृहमंत्री विधी व न्याय मंत्रालय, मुंबई हाय कोर्ट, औरंगाबाद हाय कोर्ट, राज्य मानवाधिकार आयोग यांना तसेच विविध कार्यालयात पाठवलेल्या पत्रातुन १४ वर्षात कायद्याला, सत्यमार्गाला दडपविण्याचे कार्य हे नित्य घडले तसे घडविण्याचे प्रकार घडत आले. इतकेच नाही तर १४ वर्षात कायद्यांचे, सत्यमार्गाचे पालन करु नये कायदा हातात घेऊन मी गून्हेगार व्हावे अशी परिस्थिती हि निर्माण केली त्याविरोधात आणी लोकशाहीत सत्यमेव जयते या नावाखाली चाललेल्या निष्कृष्ठ अशा गैर आणी बेकायदेशीर कारभाराच्या निषेधार्थ १८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५,३० वा. निषेध सभा घेण्याचे आयोजन केले आहे. तरी सदर निषेध सभेतुन देशाच्या संस्कृतीचे सत्यमार्गाचे पालन केल्यानंतर स्वतःमध्ये निर्भिडता निस्पक्षता कशी निर्माण झाली जागृत नागरिकांचे कर्तव्य कसे घडुन आले आदि विषयावर विशेष माहीती प्रकटन केल्यानंतर जरी सत्यमार्गाला न्याय नाही शिक्षा मिळाली तरी विजय हा सत्याचाच होणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तरी आपण या निषेध सभेत उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.