सावित्री फातेमा सद्भावना विचार मंचच्यावतीने ‘महात्मा फुले आणि इस्लाम’ पुस्तकाचे प्रकाशन

0
139

नगर – साधारणत १४०० वर्षांपूर्वी अरबस्तानात पैगंबरांनी (स.) जी आदर्श सर्वांगीण क्रांति घडवली होती, त्या क्रांतिने अवघ्या जगातील समाज सुधारकांना आश्चर्य चकित केले. स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्याय प्रस्थापित झालेला
लोकांनी डोळ्यांनी पाहिले, प्रत्यक्ष  अनुभवला म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी सुध्दा पैगंबरांच
गुणगाण करणारा जहांमर्द मुहम्मद (स.) हा पहिला पोवाडा लिहिला. तद्वतच एकोणीसाव्या शतकातील महात्मा ज्योतिराव
फुलेंच्या कार्यात अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले. तन-मन धनाने फुले दांपत्याला सर्वतोपरी
सहकार्य केले. फुले दांपत्याला पडत्या काळात मोलाची साथ देणार्‍यांमध्ये उस्मान शेख, त्यांची बहीण फातेमाबी
शेख व मुन्शी गफ्फार बेग यांचा सिंहाचा वाटा आहे. ’महात्मा फुले आणि इस्लाम’ हा अ.कादर
मुकादम साहेबांचा लेख या संबंधी खूप महत्वाचा असून तो महाराष्ट्र शासनानेही ’शोधांच्या नव्या वाटा’ या
हरि नरकेंनी संकलीत केलेल्या ग्रंथात प्रकाशीत केला
आहे. म्हणूनच ’सावित्री फातेमा सद्भावना मंच’ तर्फे तो
पुस्तिकेच्या स्वरूपात जनसामान्यांसाठी प्रकाशित करत
आहोत, असे प्रतिपादन सावित्री फातेमा सद्भावना मंचाचे
अध्यक्ष अ‍ॅड. संभाजी बोरुडे यांनी केले.
सावित्री फातेमा सद्भावना विचार मंचाच्यावतीने
महात्मा फुले आणि इस्लाम या पुस्तकाचे प्रकाशन
करण्यात आले. याप्रसंगी मंचाचे अध्यक्ष अ‍ॅड. संभाजी
बोरुडे, डॉ.रफिक सय्यद, संजय
झिंजे, अशोक सब्बन, राजुभाई
शेख, अब्दुल रहीम साहब, बापू
चंदनशिवे, मुबीन खान आदी
उपस्थित होते.
डॉ. रफिक सय्यद मनोगत
व्यक्त करताना म्हणाले की,
नगर जिल्ह्याला सद्भावनेचा
मोठा इतिहास आहे. या जिल्ह्यात
अनेक हिंदू मुस्लिम संतांनी
सद्भावना द्विगुणीत करण्याचे कार्य
केलेले आहे. म्हणून आपणही त्या
कार्याला पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले
पाहिजे. व त्यासाठीच सावित्री फातेमा सदभावना मंच
त्या दिशेने मागील अनेक वर्षापासून कार्य करत आहे. व
याला समाजातील प्रत्येक धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने
याच्यात सहभागी होत असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सब्बन यांनी
केले. प्रास्तविक मुबीन खान यांनी केले. संजय झिंजे
यांनी आभार मानले.