सामुदायिक विवाहाची संकल्पना समाजात रुजविणे गरजेचे

0
70

ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे प्रतिपादन; कल्याण रोडवरील बालाजी, विठ्ठल-रुखमाई देवस्थानच्या बालाजी उत्सवात सामुदायिक विवाह

नगर – आज विवाह जुळवणे आणि ते पार पाडणे ही मोठी जिकरीची गोष्ट झाली आहे. मोठेपणा मिरविण्यासाठी अनेकजण
अनावश्यक खर्च विवाह सोहळ्यात करत असतात. हौसेला मोल नसते. परंतु आज समाज वेगळ्या
परिस्थितीतून जात आहे, अशा परिस्थितीत लग्नातील अनवश्यक खर्चास फाटा देत आज बालाजी
उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा हा आदर्शवत असाच आहे. गेल्या ११
वर्षांपासून नळकांडे बंधू धार्मिक कार्याबरोबर सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देत आहेत. वधू-वरांच्या
पालकांचा खर्चाची बचत होऊन सामुदायिक विवाहाची संकल्पना आज समाजात रुजविणे गरजेचे
आहे, असे प्रतिपादन ह.भ.प इंदोरीकर महाराज यांनी केले.
कल्याण रोडवरील बालाजी, विठ्ठल-रुखमाई देवस्थानच्यावतीने
बालाजी उत्सवात सामुदायिक विवाह झाले. याप्रसंगी आयोजक राम
नळकांडे, माजी नगरसेवक शाम नळकांडे आदींसह सर्व परिवार
उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्वधर्मिय सामुदायिक
विवाह ही काळाची गरज आहे. बालाजी महोत्सवातील धार्मिक
कार्यक्रमाबरोबरच असा सामुदायिक विवाह सोहळ्याचा आदर्श
समाजापुढे ठेवला आहे. अशा उपक्रमामुळे समाजाला दिशा मिळणार
आहे. नळकांडे परिवाराचा यातील पुढाकार हा कौतुकास्पद असाच
आहे.
याप्रसंगी मनपा आयुक्त यशवंत डांगे, संभाजी कदम, भगवान
फुलसौंदर, संजय शेंडगे यांनीही बालाजी महोत्सवानिमित्त सर्वधर्मिय
सामुदायिक विवाह सोहळ्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले, दरवर्षी बालाजी
महोत्सव हा विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमातून
साजरा होत असतो. यात नगरसह परिसरातील नागरिक सहभागी
होत असतात. गेल्या ११ वर्षांपासून या उत्सवात सर्वधर्मियांचा
सामुदायिक विवाह सोहळ्यात ४५ विवाह लावण्यात येऊन वधूय्वरांच्या पालकांना दिलासा देण्याचे काम करत आहोत. तसेच हा
जो उत्सव पार पाडण्यासाठी आमच्या सर्व मित्र परिवार यांनी जे
सहकार्य केले ते खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले
या सामुदायिक विवाहाच्या अगोदर हभप इंदोरीकर महाराज यांचा
कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित
करण्यात आला होता.
या विवाह सोहळ्याप्रसंगी
आमदार संग्राम जगताप, हभप
इंदोरीकर महाराज, संजय शेंडगे,
उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संभाजी
कदम, भगवान फुलसोंदर, अनिल
शिंदे, बाळासाहेब बोराटे, सचिन
जाधव, अनिल बोरुडे, सचिन
शिंदे, गणेश भोसले, पुष्पाताई
बोरुडे, संतोष गेनपा, संजय
चोपडा, मनोज कोतकर, सुरेश
तिवारी, दत्ता कावरे, संदीप
दातरंगे, महेश लोंढे, सुनील
लालबोंद्रे, रवी लालबोंद्रे, प्रकाश
फुलारी आदिंनी उपस्थित राहून
वधू-वरांना आशिर्वाद दिले.
राम नळकांडे यांनी प्रास्तविकात म्हणाले कि दरवर्षीप्रमाणे
यंदाच्या बालाजी उत्सवांतर्गत धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक
उपक्रम आयोजित केले होते. तसेच सामुदायिक विवाह सोहळा
सर्वांचे आकर्षण ठरला, तीन वधू-वरांचे विवाह लावण्यात आले.
या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमचा
उत्साही वाढत असल्याचे सांगितले.
सर्वांचे स्वागत वैशाली नळकांडे, मनिषा नळकांडे, सुरेखा
नळकांडे, सुवर्णा नळकांडे, शारदा गडाख यांनी केले. सूत्रसंचालन
प्रियंका पाटील शेळके, अंकुश साबळे यांनी केले. तर रामा गुंडू यांनी
आभार मानले. बालाजी उत्सव यशस्वीतेसाठी शंभुराजे प्रतिष्ठान,
शिवाजीनगरचा राजा मित्र मंडळ, नवग्रह प्रतिष्ठान, शाम नळकांडे
मित्र मंडळ व कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले