जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांना घरवापसीसाठी तिप्पट पैसे मोजावे लागल

0
48

घर वापसीसाठी शासनाने मोफत सेवा द्यावी; पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तृतीयपंथी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध

नगर – काश्मीर खोर्‍यातील पहेलगाम जवळील बायसरण परिसरात झालेल्या अमानवी व भ्याड दहशतवादी हल्ल्याचा
तृतीयपंथी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला व या हल्ल्यात बळी पडलेल्या २६ निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शन करून प्र. निवासी जिल्हाधिकारी अरुण उंडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तृतीयपंथी समाजाचे अध्यक्ष काजल गुरु समवेत लैला गुरु, सना, गौरी, फिजा, दिया, मीनाक्षी, मोहिनी, अदा, शिवण्या, रिजवाना, सुलताना, मीरा, आयत, रोशनी, तेजू, मनू, मीना, संध्या गुरु, मोहनी, साधना, शुभांगी,
आकांक्षा आदीसह तृतीयपंथी समाज उपस्थित होता. पुढे निवेदनात म्हटले आहे की, जम्मू काश्मीर पहेलगाम येथे फिरण्यासाठी गेलेले नागरिक हे महाराष्ट्र व विविध राज्यातून आले होते मात्र दहशतवादी हल्ल्यानंतर तेथे अडकून पडले व त्यांना घर वापसीसाठी काही विमान कंपन्यांकडून ४० ते ५० हजार रुपये तिकिटासाठी घेतले. हे तिप्पट पैसे वसूल करण्यात आले ही दुर्दैवी बाब असून ही दुसरी लूट आहे. या लुटारू विमान कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व
याच्याहून पुढे शासनाने मोफत सुविधा देण्यात यावी. तसेच या संपूर्ण मनमानी तिकीट दर वाढीला निर्बंध लावण्यात यावे
या मागणीसाठी व दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. पुढे काजल गुरु म्हणाले की, आम्ही जम्मू काश्मीर येथे सहा तृतीयपंथी अडकून पडलो त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्याशी संपर्क साधून यांनी मदत केली व जम्मू काश्मीर येथे गिरीश महाजन यांनी भेट घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून आम्ही परतलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच विविध राज्यातून आलेले पर्यटक यांना तिप्पट मनमानी तिकीट दर घेतले. याकडे देखील शासनाने लक्ष घालावे कारण सर्वसामान्य कुटुंबाला
इतका खर्च परवडणारा नसून शासनाने मोफत सेवा दिली पाहिजे होती अशी भावना व्यक्त केली.