नगर – ’जिथे स्वच्छता असे, तिथे आरोग्य वसे’ हे ब्रीद घेवून नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी २३ एप्रिल रोजी श्री क्षेत्र धरम पुरी, निंबळक जवळचा परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. ‘परिसर स्वच्छ ठेवाल तर निरोगी व्हाल’, असा स्वच्छतेचा मंत्र राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सतत कानावर पडत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानामध्ये धरमपुरी मंदिरा नजदीकच्या परिसरातील कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी स्वच्छतेच्या
विविध घोषणा देत सहभाग नोंदवला.
आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आणि समाजासाठी आवश्यक असणारी स्वच्छता ही सवय विद्यार्थ्यांनी अंगीकारली तर शालेय व सामाजिक जीवनात त्याचा फायदा होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी व्यक्त केले.
स्वच्छता अभियान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. अक्षय देखणे, प्रा. अमोल कोल्हापुरे व प्रा. शीतल शेरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा. पी. जी. निकम (सिव्हील विभागप्रमुख), डॉ. एम. के. भोसले (प्रथम वर्ष समन्वयक), प्रा. एस. एम. वाळके (ई अॅण्ड टी सी विभाग प्रमुख), प्रा. ए. बी.
काळे (मेकॅनिकल विभागप्रमुख), प्रा. एस. पी. विधाते (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख), डॉ. व्ही. व्ही. पाटील (ए.आय. विभागप्रमुख) आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.