पाण्याचा प्रश्न गंभीर, सर्वत्र घाण; आरोग्य आले धोयात; अनागोंदी कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी ठोकले टाळ

0
64

नगर – नगर एमआयडीसी परिसरात असलेल्या नवनागापूर ग्रामपंचायतच्या सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे मोठी
लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायत हद्दीत राहणारे नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य, निर्माण झालेला पाणी प्रश्न या समस्यांनी हैराण झालेल्या ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ कार्यालयास टाळे ठोकत आपला संताप व्यक्त केला आहे. नवनागापूर ग्रामपंचायत अहिल्यानगर
जिल्ह्यामधील सर्वात मोठी व सधन ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते. पण याच ग्रामपंचायतीमध्ये मागील काही वर्षापासून
मोठे ग्रहण लागलेले आहे. ग्रामपंचायतीमध्ये एमआयडीसी असल्यामुळे येथील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात
होतात व त्याचाच गैरफायदा काही ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी घेऊन आता नवनागापूर ग्रामपंचायत व समस्त कार्यकारी मंडळ वादाच्या भोवर्‍यात अडकलेले आहे. अनेक प्रकारच्या प्रशासनिक चौकशीला सामोरे जात आहेत.
नवनागापूरचे ग्रामपंचायत तीन वर्षापासून नेहमीच विवादाच्या घेर्‍यात अडकलेली दिसते. पाणी प्रश्नावरून ही खूप मोठा ग्राम सभेत गदारोळ झाला होता. मागील एक महिन्यापासून कचरा उचलणे बंद असल्यापासून मुळे व ग्रामपंचायतीच्या ढिसाळ व्यवस्थापनाबद्दल ग्रामस्थांमध्ये अत्यंत नाराजीचा सूर दिसून येत आहे. गावचे सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना कसलीही पूर्वसुचना न देता अचानक कचरा संकलन करणार्‍या सर्व घंटागाडी बंद केल्या आहेत. त्यामुळे सुमारे २५ हजार लोकसंख्येच्या गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी कचर्‍याचे ढिगारे व त्यातून पसरणारा दुर्गंध, तसेच
सदर कचरा गावातच पेटून दिल्यामुळे धुराचे साम्राज्य तयार झालेल आहे, प्लास्टिकच्या उग्र धुरामुळे नागरिकांना गुदमरल्यासारखं होत आहे. यामुळे गावातील सर्वसामान्य लोक वयस्क व लहान मुलांच्या
आरोग्याच्या अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना
डायरिया सारखे गंभीर स्वरूपाचे साथीचे आजार होऊ लागले
आहेत. पण ग्रामपंचायत प्रशासनाला कसल्याही प्रकारची काळजी
घेतलेली नाही. सर्वांना वार्‍यावर सोडून सरपंच व ग्रामसेवक गाड
झोपेचे सोंग घेतलेल आहे. यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी ३ मार्च
रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे व
गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनआक्रोश
आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला व घोषणाबाजी करत
घंटागाडी तात्काळ सुरू करण्याची मागणी
केली.
पण सरपंच आंदोलकांना उत्तर न देता
घरी निघून गेले. ग्रामसेवकांना दुसर्‍या गावाचा
चार्ज असल्यामुळे तेही खूप उशिरा आंदोलन
स्थळी आले. ग्रामअधिकारी व सरपंच यांचा
आपसातील ताळमेळ कमतरता लक्षात
आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नवनागापूर
ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्यात
आले व जाहीर इशारा दिला की गावातील
कचरा व्यवस्थापन पूर्ववत करून कचरा गाडी
पूर्ववत सुरु करत नाहीत, तोपर्यंत ग्रामपंचायत
कार्यालय बंदच राहील. याबद्दल जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष
येरेकर व गटविकास अधिकारी श्री. सोनकुसाळे
यांनी या प्रकारणात लक्ष घालून सखोल
चौकशी करून, समस्त ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा.
गटविकास अधिकारी आल्याशिवाय व लेखी दिल्याशिवाय
ग्रामपंचायतीचे टाळे उघडले जाणार नाही, असा इशारा सर्व नागरिक
व ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब सप्रे, संजय भोर, सागर
सप्रे, सुशीला जगताप, कल्पना गीते, रंजना दांगट, संगीता भापकर,
रेणुका पुंड, राधाबाई फापाळे, सुभाष दांगट, संजय गीते, महादेव
सप्रे, राम घाडगे, सोमनाथ काळे, राजेंद्र शिंदे, संतोष आजबे, डॉ.
संजीव गडगे, अशोक साळवे, हेमंत लगड, बाळासाहेब मोरे, विपुल
भोसले, विशाल बरे, बाबासाहेब शेवाळे, राम अडसुरे, पवन मोरे,
भास्कर घोरपडे, आकाश कोल्हाळ, संदीप गायकवाड, राजेंद्र नागुडे,
नितीन खंडारे, हेमंत राऊत, गुलाब ठुबे, दादा गडगे, सुनिल मते,
भास्कर घोरपडे, रामदास जाधव, दत्तात्रय लोखंडे यांच्यासह ग्रामस्थ
उपस्थित होत