श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे समर्थ विद्या मंदिर दासनवमी उत्सवनिमित्त आयोजित निबंध
स्पर्धेत बक्षीस मिळवणारे सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलचे विद्यार्थी.
नगर – श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे समर्थ विद्यामंदिर आयोजित दासनवमी उत्सवनिमित्त ६ फेब्रुवारी रोजी घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील कुमारी कशिश आमिन शेख (इयत्ता ७ वी) हिचा निबंध
स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला तसेच इयत्ता पाचवी ते सातवी गट मुले यांचा सूर्य नमस्कार स्पर्धेत
प्रथम क्रमांक आला. कुमारी वैष्णवी अंकुश सोनवणे (इयत्ता नववी) हिचा हस्ताक्षर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक
आला तसेच ८ वी ते१० वी गटातून मुलांचा सूर्यनमस्कार स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला. श्रीमती मनीषा नरेंद्र बोर्डे कदम यांचा
खुल्या गटातून मराठी निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे
सचिव गाडीलकर सर तसेच सर्व पदाधिकारी व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड
सर व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग
यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले