पुरस्कारासाठी निर्माण होणारे साहित्य घातक

0
47

डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांचे प्रतिपादन; शहरात १६ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन

नगर साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत. मात्र, वृतस्थ पद्धतीने लिहिले जाणारे साहित्य चिरकाल टिकते आणि आनंद देते. यण, केवळ पुरस्कारासाठी लिहिले जाणारे साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे, अशी खंत व्यक्त करीत साहित्याच्या प्रयोजनामध्ये, जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे, असे मत सोळाव्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केली.

शब्दगंध साहित्य परिषदेच्या १६ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे डॉ. तेडगावकर, पद्‌श्री पोपटराव पवार, आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. याप्रसंगी स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माळवेत संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भापकर, महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. राजेश गायकवाड, माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लहू कानडे, माजी जिल्हा परिषद देविदास धस, जयंत येलूलकर, ज्ञानदेव पांडुळे, सुनील गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी साहेबराव दरेकर यांना शब्दगध जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर, डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांना कॉ. गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जंगलातील सांबराची परोपकाराची गोष्ट सांगून अध्यक्ष डॉ. तोगावकर म्हणाल्या, आज माणूस स्वत पुरता जगत आहे. जंगलातले प्राणी सुद्धा इतरांसाठी जगातात. माणसाने प्राण्याकडून परोपकार शिकला पाहिजे. आपल्या कळपाला वाचवण्यासाठी प्राणी जीव देतात. पण, माणसे घरे लावून घेतात. आजचा काळ अस्थवस्त करणार आहे. राजकारण, सामाजकरण, कौटुंबिक जीवनात सर्वत्र अस्वस्थता आहे. घरामधील स्त्री सुरक्षित नाही, लहान मुली सुरक्षित नाहीत, माणिपूर सारख्या घटना घडतात. आपण त्या पाहतो. त्याला विरोध करीत नाही. हे विचार करायला लावणारे आहे. आज आपण एकमेकांशी मोठ्याने बोलायला घाबरत आहोत एकमेकांकडे संजयाने पाहत आहोत. पूर्वीसारखे आता हेल्दी राजकारण आता राहिले नाही. राजकारण्यांनी काही गोष्टी बिघडवल्या असे म्हणता येईल. साहित्यिकांनी दीन, दुबळ्यांची बाजू मांडली पाहिजे खंबीर भूमिका घेतली पाहिजे. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भालचंद्र नेमाडे, डॉ. आ. ह. साजुखे यांचे वारसदार आहोत म्हणून आपण विचार करण्याची गरज आहे. स्वी स्वातंत्र्याविषयी बोलताना त्यांनी चेटकिणीची गोष्ट सांगून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला स्वीला स्वातंत्र्य धा ती संसाराचा बगीचा करते असे त्या म्हणाल्या.

प‌द्मश्री पोपटराव पवार म्हणाले, शब्दगंध साहित्य चळवळ उभी राहताना मी पाहिली आहे. मात्र, या चळवळीला राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी १२ बलुतेदार आणि १८ पगडजातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले हे आपल्याला साहित्यातून समजते. त्या काळातील परिस्थितीनुसार साहित्य निर्माण होते. संत साहित्य निर्माण झाले. इंग्रज कालखंडात स्वातंत्र्याचा महिमा गाणारे साहित्य निर्माण झाले. साहित्य वाधून माणूस खचत नाही तर उभारी घेतो. साहित्य मानवी जीवनाला प्रेरणा देते नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा कालखंड येत आहे. तंत्रज्ञानाने माणसाच्या मेंदूतील मेमरी कार्ड काढून घेतले आहे. त्यामुळे आता पर्यावरमचे, मानवी जीवनाचे साहित्य निर्माण करावे लागणार आहे.

आ. संग्राम जगताप म्हणाले, नव्या पिढीला आपल्याला शब्दगंधशी जोडायचे आहे. नवी पिढी याच्याशी जोडली तर ही परंपरा सुरू राहणार आहे. आजच्या काळात डिजीटल युग असून, वाचन संस्कृती तितकीच सिनेकल महत्त्वाची आहे. साहित्य पिदधान् पिद्धया वाचायला मिळते. नवीन पिढी घडविण्यासाठी नवसाहित्यिकांनी पुढे आले पाहिजे. शब्दगंधने अनेक माणसे जोडली. आजच्या घडीला राजकारणी धार्मिक तसेच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, त्या पाठीमागे त्याचा वेगळाच अजेंडा असतो. पण, साहित्य माणसात देव शोधायला शिकवते. शब्दगंधमुळे चांगली चळवळ निर्माण झाली आहे. या चळवळी निश्चित बाळ देण्याचे काम करू, असे ते म्हणाले.

पुरूषोत्तम भापकर म्हणाले, साहित्यिक संत असतो आणि संत साहित्यिक असतात. साहित्यातून शेतकरी, दीन, दलित, दुबळ्यांचे दिसून येते. साहित्यातून जातीभेद, लिंग भेद दूर करणारे विचार यायला हवे. प्रत्येक माणूस साहित्यिक असू, असतो त्याच्या चिंतनात सदभाव असते. साहित्यामुळे माणूस वाईट गोष्टीपासून बाजूला राहतो. साहित्य आणि साहित्यिकांना पाठबळ देण्याची जबाबदारी शासन, प्रशासन आणि राज्यकत्यांनी घेतली पाहिजे. आजमितीला सहिष्णूतेचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्या महाराष्ट्राला संत, महात्म्यांची परंपरा आहे. मात्र, दुर्दैवाने ते आता गटा-गटाने वाटून घेण्याचा प्रयत्न होत आहे. साहित्यिक म्हणून तो प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.

डॉ. राजेश गायकवाड म्हणाले, शब्दगंध साहित्य संमेलनाकरिता पहिल्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने दोन लाखांचा निधी दिला. त्यासाठी मंडळाकडे प्रयत्न केले. आता मराठी भाषेला अभिजता दर्जा मिळाल्याने येणाऱ्या काळात शब्दगंध साहित्य संमेलनाला पाच लाखाचा निधी मिळणार आहे. दोन लाख राज्य शासनाचे आणि तीन लाख केंद्र शासनाचे असा निधी उपलब्ध होणार आहे. तर, नवलेखकांसाठी खास योजना आखण्यात आली असून, नवलेखकाचे पहिले पुस्तक मोफत प्रकाशित करून देण्यात येणार आहे. तसेच, चरित्र ग्रंथ लिहिणाऱ्याांना अनुदानही दिले जाते. त्यासाठी त्यांनी मंडळाकडे पाठपुरावा करावा,

शब्दगंधचा वटवृक्ष होईल माजी आमदार ट्रेकर

साहेबराव दरेकर म्हणाले, साहित्यमध्ये, अभंगामध्ये आपले मनाचा ओलावा पहायला मिळतो. १२ ते १३ शतकात संत मंडळीने निर्माण केलेल्या साहित्याने जातीभेदाच्या मिती तोडल्या. त्यामुळे भविषाकाळ घडवायचा असेल तर आपल्याला भूतकाळ अभ्यासावा लागेल. गेल्या १६ वर्षापासून शब्दगंध परिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करीत असून, त्याचा निश्वितच वटवृक्ष होईल, असा आशावाद व्यक्त केला.

माणसाला न्याय देण्याची भूमिका साहित्यात संपत बारस्कर

स्वागत अध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले, तसा साहित्य संमेलनाचा आणि माझा फारसा संबंध आला नाही. मात्र, सोलापूरला झालेले साहित्य संमेलन पाहण्यासाठी गेलो होतो. विद्रोही साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहायला मिळाले, तिथे वाचल तर वाचाल नाही तर हे वाक्य ऐकले. तेव्हापासून वाचनाकडे लक्ष देत आहे. माणसाला माणूस म्हणून न्याय देण्याची देण्याची भूमिका साहित्य घेत असते