नगर – बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रम्हचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. चिन्मय कृष्णदास हे बांगलादेशातील हिंदू समाजाचे प्रतिनिधीत्व करत होते व तेथील अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवत होते. ही घटना अत्यंत दुःख व खंत व्यक्त करणारी असून, स्वामी चिन्मय कृष्णदास यांची त्वरित सुटका करण्यात यावी याचबरोबर पुणतांबा (जि. अहिल्यानगर) या ठिकाणी महादेवाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. पुणतांबा येथे जाधव, बालाजी रायपेल्ली, ओंकार जेटला, किशोर भागानगरे, गणेश वाळुंजकर आदींसह विविध संघटनांचे ३५ हुन अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते. भारत सरकारने तात्काळ निर्णय घेऊन उपाययोजना करावी : नामदेव जायभाय सध्या आपण पहातो, मंदिरावर हल्ले होतात, हिंदूंचे धर्मांतरण होते, ही गोष्ट गंभीर आहे. आज बांग्लादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात, पूर्वी पाकिस्तान, अफगानीस्तान या ठिकाणीही हिंदूंची संख्या कमी झाली. तरी या सर्व घटनेचा विचार करता भारत सरकारने यावर तात्काळ निर्णय घेऊन बांगलादेशातील हिंदू व मंदिरे सुरक्षित करावी, असे ते यावेळी म्हणाले. याचबरोबर दिगंबर गेंट्याल, बापू ठाणगे यांनीही मनोगत व्यक्त केले. या आंदोलनाद्वारे एक ठाम संदेश दिला गेला की, हिंदू धर्मावर होणार्या एकाच महिन्यात ही दुसरी घटना असून १३ डिसेंबर रोजी हनुमान मंदिरात तर २३ डिसेंबर रोजी महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना करण्यात आली. या घटनेचा लवकरात लवकर तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अहिल्यानगर येथील दिल्लीगेट येथे साय. ५ ते ६ या वेळेत हिंदू राष्ट समन्वय समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी जय श्रीराम, हर हर महादेव अशा घोषणाही देण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील मंदिर तसेच बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेच्या मागण्यांसाठी दिल्लीगेट येथे आंदोलन करताना हिंदुत्ववादी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते. या आंदोलनाला दिगंबर गेंट्याल, छावा युवा मराठा महासंघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर गोरे, अधिवक्ता नामदेव जायभाय, मंदिर महासंघाचे गणेश पलंगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख व अहिल्यानगर जिल्हा हिंदू संघटक बापू ठाणगे, भाजप महिला आघाडीच्या सौ. सुरेखा विद्ये, सनातन संस्थेचे विनायक बत्तीन, हिंदू जनजागृती समितीचे परमेश्वर गायकवाड, संतोष गवळी, यश आघातांचा विरोध करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. पुणतांबा येथील हनुमान मंदिर व महादेव मंदिरातील घटनांची सक्षम व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी आणि दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, आरोपी खरच मनोरुग्ण आहे का, याची तपासणी सक्षम वैद्यकीय अधिकार्यामार्फत करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व मंदिरातील दानपेट्या चोरीच्या घटनांची सखोल चौकशी करून दोषींना अटक करण्यात यावी, जिल्ह्यातील सर्व मंदिरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात यावी, जेणेकरून भवीष्यात अशा घटना होणार नाहीत, आदी मागण्या करण्यात आल्या.