पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने पूरनियंत्रणाच्या नावाखाली जिल्ह्यात वाळूचा बेसुमार उपसा

0
48

ऊस, दूध उत्पादकासह शेतकरी देशोधडीला, वाळू उपशा विरोधात २४ मे रोजी उपोषण व धरणे आंदोलन 

नगर – जिल्ह्यातील राहता, राहुरी, संगमनेर व श्रीरामपूर तालुयांच्या हद्दीत शासनाच्या वतीने ठेकेदाराच्या माध्यमातून प्रचंड वाळू उपसा चालू आहे. या वाळू उपशामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने वाळू उपशाच्या माध्यमातून चक्क दरोडेखोरी सुरू असून, कारखान्याच्या माध्यमातून विखे कुटुंबाने ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला तर लावला आहेच आणि आता दूध उत्पादक शेतकरीही नागवला आहे. पूरनियंत्रणाच्या नावाखाली वाळू उपशाला अधिकृत परवानगी देऊन शेतकर्‍यांचे नुकसान केले जात असून, या वाळू उपशा विरोधात मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समिती २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे अरुण कडू पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक : गौ- १० / १२२२/प्र. क्र.८२/ ख-१ दि. १९/४/२०२३ नुसार हा प्रचंड वाळू उपसा सुरू आहे. शासनाचा हा निर्णय प्रवरा परिसर पूर्ण उजाड करणारा आहे. या निर्णयासाठी पूर नियंत्रणाची भीती दाखवण्यात आलेली आहे. परंतु पूरनियंत्रण आणि या वाळू उपशाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. नदी खोलीकरणाच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारचा मुद्दा शासनाच्या वतीने मांडलेला आहे. तोही तदन खोटाच आहे. या खोलीकरणामुळे काठाच्या बाहेर, काठापासून दूर असलेल्या विहिरीचे पुनर्भरण होण्या ऐवजी हे पाणी नदीकडे खेचले जाणार आहे. पर्यायाने दूरच्या शेतातील विहिरीसुद्धा कोरड्या पडणार आहेत. किंवा त्यांच्या पाण्याची पातळी खलावणार आहे. या परिसरात के. टी. वेयर्सचे बंधारे आहेत. आश्वी, दाढ, रामपूर आणि कोल्हारचा बंधारा असे अनेक बंधारे या परिसरात आहेत. बंधार्‍यांना नक्कीच धोका होणार आहे. बंधार्‍यांप्रमाणेच या नदीपात्रात अनेक शेतकर्‍यांच्या विहिरींचे सिमेंटचे कडे आहेत. हे कडे सुद्धा कलंडण्याची किंवा ढासळण्याची शयता आहे. किंवा आजच त्याच्या भोवतालची वाळू कमी झाल्यामुळे ते साळतीलच अशी परिस्थिती झाली आहे. खरे तर वाळू विक्री चे शासनाचे धोरण महाराष्ट्रात फसलेलं आहे. परंतु त्या फसण्याची भरपाई या ठिकाणी प्रवरा परिसरातच फक्त केली जात आहे. हा वाळू उपसा पाण्याअडून केला जात आहे. त्यामुळे मोजमापाचा काही पत्ता नाही.

काही शेतकर्‍यांनी स्वतःच्या शेतीच्या बाजूला नदीमध्ये पीव्हीसी पाईप टाकून मोजमाप घेण्याचा प्रयत्न केला तर ही खड्डे चक्क तीस फुटापेक्षा जास्त असावेत अशी परिस्थिती आहे. याच संदर्भात आणखी महत्त्वाचा मुद्दा की, मंत्री महोदयांनी स्वतःचा मतदार संघ किंवा तालुका किंवा स्वतःच्या अकित राहत्याच्या तहसीलदाराकडून हा निर्णय व त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. म्हणजे नदी परिसर स्वमालकीचा आहे या मजासखोरीतून हे सर्व सुरू आहे. वाळू उपसा हा राहाता तालुयात आहे म्हणून दाखवण्यात येत असली तरीसुद्धा पाण्याअडून ही वाळू चक्क राहुरी तालुयाच्या बाजूने सुद्धा ढासळत आहे. पाण्यातल्या पाण्यात ढासाळली जाणारी वाळू केवळ राहाता तालुयातील नव्हे तर राहुरी तालुयातील काठाच्या बाजूने प्रचंड मोठा वाळू उपसा होत आहे. या आणि अशा कितीतरी बाबी या वाळूच्या निमित्ताने निदर्शनाला येत आहेत ज्यांचा निषेधच केला पाहिजे. मात्र केवळ निषेध करून न थांबता या वाळू उपशाला तीव्र विरोध करीत आहोत. हा वाळू उपसा त्वरित थांबलाच पाहिजे. वाळू उपशाचा प्रश्न आज पूर्णपणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या भोवती फिरतो वाळूच्या संदर्भात आत्तापर्यंत त्यांची जी धोरणे होती ती धोरणे या नदी काठच्या शेतकर्‍यांच्या दृष्टीने अत्यंत घातकी अशीच शाबीत झालेले आहेत. त्यांच्या एकुणच कारकीर्दीविषयी जर बोलायचं ठरलं तर साखर कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी हा परिसर आणि परिसरातील शेती आणि शेतकरी यांच्या साठी घातकी आणि अपशकुनीच आहे.

कमी भाव, दोन दोन महिने विलंबाने उस तोड, संशयास्पद वजन अशा माध्यमातून शेती आणि शेतकरी अगोदरच उध्वस्त झालेले आहेत. त्यात आता मध्यंतरीच्या काळात त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन खाते आल्यानंतर जी उलथापालथ त्या खात्यात चालू आहे ती सुद्धा पशुपालक आणि एकूणच दूध धंदा यांच्या दृष्टीने उद्ध्वस्त करणाराच आहे. दूध उत्पादक उध्वस्त झालेलाच आहे. साखर आणि दूध यात शेतकर्‍यांना नागवल्यानंतर आता हे मंत्री शेतकर्‍यांची जीवनदायीनी, अमृतवाहिनी प्रवरामायला ओरबाडायला निघाले आहेत आणि पर्यावरणही उध्वस्त करायला निघाले आहेत. परिसरातील शेती शेतकरी व्यापार उदीम, बाजारपेठ सुद्धा उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणूनच त्या विरोधात शुक्रवार २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि धरणे आंदोलन करणार असल्याचे अरुण कडू पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी अरुण कडू, भास्कर फणसे, भास्कर दिघे, बापूसाहेब दिघे, आदिनाथ दिघे, अरुण दिघे, सागर कडू, गणेश कडू, नरेंद्र कडू, दिलीप कडू, सूर्यभान डुक्रे, बाळासाहेब खर्डे, अवधूत चोरमुंगे, शाम दळे, अरुण खर्डे आदी उपस्थित होते.