इयत्ता बारावीच्या ‘बोर्ड परीक्षे’चा नगर जिल्ह्याचा ९३ ४० टक्के निकाल

0
45

पुणे विभागात नगर जिल्ह्याचा टक्का घसरला; ४ हजार ८९ विद्यार्थी झाले नापास

नगर – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२वी च्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२१) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर केला आहे. या निकालात नगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के लागला असून पुणे विभागात नगर जिल्ह्याचा निकाल थेट तिसर्‍या क्रमांकावर घसरला आहे. तर पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक (९५.१९ टक्के) मिळविला असून सोलापूर जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर (९३.८८ टक्के) आहे. नगर जिल्ह्यात ६१ हजार ९६६ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्या पैकी ५७ हजार ८७७ विद्यार्थी पास झाले आहेत. तर ४ हजार ०८९ विद्यार्थी नापास झाले आहे. पास होणार्यांषमध्ये मुलींचे प्रमाण ९६.४८ टक्के तर मुलांचे प्रमाण ९१.०८ टक्के एवढे आहे. जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.९०, कला शाखेचा ८२.२६, वाणिज्य शाखेचा ९२.१० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेच्या निकालात वाढ झाली आहे. मात्र कला व वाणिज्य शाखेचा निकाल घसरला आहे.

जिल्ह्यात सलग तिसर्‍या वर्षीही शेवगाव तालुकाच प्रथम

१२ वी च्या परीक्षेच्या निकालात गत २ वर्षाप्रमाणे या वर्षीही शेवगाव तालुयाचा प्रथम क्रमांक आला आहे. शेवगावचा निकाल ९५.६२ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ जामखेड -९५.४७, संगमनेर – ९५.२२, पारनेर – ९३.८३, नगर – ९४.४१, नेवासा – ९४.६६, कर्जत – ९४.६०, कोपरगाव – ९२.१३, पाथर्डी – ९२.७६, राहता – ९३.८७, राहुरी – ९२.०३, श्रीगोंदा – ९३.१७, अकोले – ९०.५९ तर गतवर्षी प्रमाणे या ही वर्षी जिल्ह्यात सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुयाचा ८५.८० टक्के लागला आहे.