सगेसोयरेच्या अधिसूचनेवर नगरमधून एक लाखाहून अधिक हरकती दाखल

0
30

सकल ओबीसी समाजाच्या वतीने नगरमधून जवळपास एक लाखा पेक्षा हरकतींचे अर्ज मुंबई येथे सामाजिक भवन येथे जमा करताना बाळासाहेब भुजबळ, ब्रिजेस ताठे, रोहित पठारे, कौस्तुभ रासने, मनोज भुजबळ आदी.

नगर – कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयर्‍यांनाही ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याबाबत राज्य सरकारने २६ जानेवारी २०२४ रोजी अधिसूचना काढली. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निर्णयामुळे राज्य सरकारने अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशनही बोलविण्यात आले आहे. मात्र सरकारच्या अधिसूचनेला ओबीसी प्रवर्गातून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या आहेत. नगरमधून जवळपास एक लाखा पेक्षा जास्त हरकती मुंबई येथे सामाजिक भवन येथील पोहोच करण्यात आल्या आहेत. नगर शहरात हरकतींचे अर्ज संकलित करून गावनिहाय, तालुकानिहाय, वर्गीकरण करून नगर तालुका, संगमनेर, अकोले, राहाता, शिर्डी, श्रीरामपुर, नेवासा,कोपरगाव, कर्जत, जामखेड,पाथर्डी,शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा या तालुयातील हरकतींचे अर्ज जिल्ह्यातून आले होत ते मुंबईला सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागात जमा करण्यात आले. तशी पोहोच पावती ही घेण्यात आली अशी माहिती बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. याप्रसंगी सकल ओबीसी समाजाचे ब्रिजेस ताठे, रोहित पठारे, कौस्तुभ रासने, मनोज भुजबळ आदी उपस्थित होते. या सर्व हरकती अर्जांचे तालुका निहाय वर्गीकरण करण्याचें काम ज्ञानदेव खराडे, एकनाथ व्यवहारे, अनुरीता झगडे, भाऊसाहेब कोल्हे, विनोद पुंड, सुधीर पुंड, मच्छिंद्र बनकर, आनिल इवळे, संदीप भांबरकर, सुधाकर कानडे, संजय कानडे, रामदास फूले, गोरख बोरुडे, निलेश चिपाडे, बाळासाहेब इवळे आदींनी केले