तल्लख स्मरणशतीसाठी
३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती
वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम मुलांना दिल्याने मुलं खूपच बुद्धिमान आणि शहाणे होतात. सकाळी
शंखपुष्पीचे थोडे पाणी घालून रस काढता येतो. शुद्ध रस १०-२० मिलीग्रॅम किंवा २-४ ग्रॅम
पूड मध, तूप आणि साखरेबरोबर सहा महिन्यांपर्यंत सेवन करीत राहिल्याने स्मरणशक्ती आणि
बुद्धीत वाढ होते.