डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जनजागृती अभियान

0
23

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने बागडपट्टी तोफखाना येथे डेंगू मुक्त कार्यक्रम : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांग

नगर – शहरामध्ये डेंग्यू मुक्त अभियान  सुरू केले असून १७ आठवड्यामध्ये १८हजार ७२२ घरांना भेटी दिल्या असता ५१
हजार ८०० पाणीसाठे तपासले असून ७१२ डेंग्यू सदृश्य अळया आढळून आल्या असता पाणीसाठे नष्ट करत औषध फवारणी केली, तसेच नागरिकांच्या आरोग्य तपासणी करत रक्ताचे नमुने तपासणी सध्या शहरात जानेवारी
ते सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले आहे. नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराबाबत अभियानाच्या माध्यमातून जनजागृती केली
असल्यामुळे डेंग्यू आजाराच्या रुग्णांची संख्या कमी आढळली असून अभियानाला यश आले, सिताराम सारडा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी डेंग्यूबाबत आपल्या भाषणातून जनजागृती करत पाहुण्यांची मने जिंकली, शाळा विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने बागडपट्टी तोफखाना येथे डेंग्यू मुक्त अभियानानिमित्त नागरिकांच्या घरोघरी जाऊन पाणीसाठ्याची तपासणी करण्यात आली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर मालनताई ढोणे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, मुख्याध्यापिका नंदा कानिटकर, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, डॉ. सृष्टी बनसोडे, हिवताप आरोग्य निरीक्षक पुरुषोत्तम आडेप आदीसह विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक उपस्थित होते मालनताई ढोणे म्हणाल्या की, महापालिकेच्या युक्त यशवंत डांगे हे शासनाच्या
आरोग्य विभागाच्या योजना कागदावर न ठेवता त्या जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करत आहे, नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराबाबत जनजागृती केली असल्यामुळेच डेंग्यू आजाराचे रुग्ण कमी प्रमाणात आढळले आहे तसेच तोफखाना आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी चांगले काम करत असल्याचे त्या म्हणाल्या.
मुख्याध्यापिका नंदा कानिटकर म्हणाल्या की, नागरिकांनी स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून, परिसरापासून
सुरू करून डेंग्यू आजाराच्या डासाला हद्दपार करू, प्रत्येक गोष्ट शासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी देखील सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजासाठी आपले कर्तव्य पार
पाडणे गरजेचे आहे यासाठी आपण साठवून ठेवलेले पाणीसाठे तपासावी, परिसर स्वच्छ ठेवावे, आठवड्यातून एक दिवस  रडा दिवस पाळावा अशा त्या म्हणाल्या. यावेळी इयत्ता सातवी मधील प्रशिका जाधव व इयत्ता चौथी मधील अर्णवी कांबळे या विद्यार्थिनी डेंग्यू या विषाणूजन्य आजारावर सविस्तर असे भाषण करत स्मृतींची मने जिंकली. कार्यक्रमाची प्रास्ताविक
डॉ. सृष्टी बनसोडे यांनी केले. मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी आभार मानले.