सरकारी शाळा वाचविण्यासाठी शहरात रॅली

0
51

नगर – सरकारी शाळा वाचवा आणि मोफत शिक्षण न्याय व हक्क परिषद अभियान या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर शहर तसेच निवडक तालुकास्तरावरून  विद्यार्थी, पालक, सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांच्या सहभागातून २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
व मार्केटयार्ड चौक येथील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन व पुष्पहार अर्पण करत जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या वतीने सरकारी शाळा वाचवा असे पोस्टर हातात
घेऊन सरकारी शाळा वाचवा, आम्हांला मोफत शिक्षण द्या, शिक्षण
आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या मालकीचं अश्या घोषणा देत हा सर्व
परिसर दानाणून निघाला होता. या रॅलीतून मांडण्यात येणार्‍या प्रमुख
मागण्यांमध्ये शिक्षणातील खाजगीकरण रोखणे, लहान शाळा बंद
करण्याचे धोरण थांबवणे, वाड्यावस्त्यांवरील १०-२० पटाखालील
शाळा कायम ठेवणे, अंगणवाडीपासून उच्च व्यावसायिक शिक्षणापर्यंत
मोफत व सक्तीचे शिक्षण, खाजगी शाळा-महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाने भरणे, राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या
मुलांचे सरकारी शाळांमध्ये सक्तीने शिक्षण घेणे बंधनकारक करावे,
आमदार-खासदार निधीतून शाळा दुरुस्ती व देखभाल निधी
उपलब्ध करून द्यावा, शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने
भरणे या महत्त्वाच्या मागण्यांसाठीची जनजागृती करणे हा होता.
रॅलीच्या माध्यमातून शिक्षण विभागातील दर्जा घसरल्याची कारणे व
वास्तव यातून शासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले.
या संदर्भात शाळा वाचवा
या रॅली चे मुख्य संयोजक
सुदाम लगड यांनी सांगितले
की, शासकीय व अशासकीय
आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा
नाहीत, शिक्षकांची कमतरता आहे,
व्यवस्थापनातील त्रुटी, शैक्षणिक
दर्जा खालावणे, विद्यार्थी समस्या,
समाज व पालकांचा कमी सहभाग
आणि यंत्रणेत समन्वयाचा अभाव
या गंभीर मुद्द्यांवर शासनाने
गांभीर्याने विचार करणे आवश्यक
आहे. शिक्षण सर्वांसाठी समान
आणि मोफत व्हावे, हा आमचा आग्रह असल्याचे त्यांनी यावेळी
बोलताना सांगितले.
या आंदोलनासाठी रावसाहेब क्षेत्रे, कॉम्रेड प्रवीण सोनवणे,
कॉम्रेड संदिप सकट, सुनिल ढोले, विजय भारस्कर, योगेश साबळे,
लक्ष्मण शिंदे, जालू शेलार, राहूल ठोकळ, रुपेश जगधने, जालिंदर
निकम, कृष्णा लोहकरे, सकट, अलिशा गर्जे, लोककलावंत अनंत
द्रविड, अ‍ॅड. जितेंद्र आढाव, प्रा.श्याम शिंदे, प्रा.बापू चंदनशिवे आदी
मराठी शाळेमधील विद्यार्थी सहभागी झालेले होते.