शिष्टमंडळासमवेत आ.संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेत कारवाईची केली मागणी
नगर – नगर तालुयातील वाटेफळ येथील अनिल व विजय वालचंद गांधी, बाबुर्डी येथील सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथील धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोजपणे पाल टाकण्याचे काम केले जाते. त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली. यावेळी जयेश पोखरणा, पिंटू कटारिया, कमलेश भंडारी, दिनेश संकलेचा, रोहन बोरा, संदीप बोरा, गणेश बुरा, नितीन शिंगवी, रितेश सोनीमडलेचा, सचिन छाजेड, मनीष लोढा, ईश्वर बोरा, दिनेश संकलेचा, भरत गुरुनानी, पराग मानधना आदी उपस्थित होते. शहरातील व्यापार्यांच्या जमिनीवर नगर तालुयातील गावांमध्ये विशिष्ट सम ाजाकडून पाल टाकून ताबेमारी केली जाते तसेच खंडणी मागत दमबाजी केली जाते अशा लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून यावेळी कारवाईची मागणी केली. अशा प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय-हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केले जाईल असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले.