अहमदनगर शहर हे खडडेमुक्त करा अन्यथा खड्यांत वृक्षारोपण करुन आंदोलन करणार

0
106

नगर – अहमदनगर शहरातील वाढती लोकसंख्या नुसार महानगरपालिका होऊन गेली २०-२५ वर्षे होत आहे. परंतू शहरातील खड्डे काही कमी झालेले दिसत नाही. भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्षे होऊन सुध्दा व अहमदनगर हे ऐतिहासीक शहर म्हणून ओळखले जात असतांना देखील खड्डेमय शहराचे नाव काही पुसले गेलेले नाही. नगर शहरात खड्डे आहेत की, खड्ड्यात नगर शहर आहे हे काही समजत नाही. खड्ड्यामुळे वाहन चालकांना मणयांचा त्रास होत आहे. तसेच शहरातील रिक्षावाले यांच्या मणयात गॅप तसेच मानदुखीचा त्रास, गाड्ड्यांच्या दुरुस्तीचा खर्च वाढू लागला आहे. खड्ड्याांमुळे व्यापारीसुध्दा त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत वारंवार निवेदन देऊन सुध्दा कोणतीच कार्यवाही होत नाही. शहर खडडेमुक्त करा अशा मागणीचे निवेदन शिवालय फाउंडेशनच्या वतीने महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आले आहे.

शिवालय फाउंडेशनचा इशारा

याप्रसंगी शिवालय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामराजे (नागेश) शिंदे, जिल्हाध्यक्ष दिपक गुंजाळ, सुनिल ठाकरे, मच्छिंद्र शिंदे, शंकर गोरे, राहुल चौधरी, ईश्वर जायभाय, बबन उगलमुले, सिताराम खाकाळ आदी उपस्थित होते. शहरातील प्रोफेसर चौक ते प्रेमदान चौक, लालटाकी, सर्जेपुरा ते तेलीखुंट कापड बाजार चौक, तोफखाना पोलीस स्टेशन ते झोपडी कॅन्टीन चौक, तोफखाना पोलीस स्टेशन (लक्ष्मी आई मंदिर) ते तारकपूर रस्ता, अप्पुहत्ती चौक ते खाकीदास बाबा मठ, आदी रस्ते खड्डेमय झाले आहेत. आठ दिवसात संघटनेच्या मागण्या पुर्ण न झाल्यास नगर शहरातील खडडयांमध्ये झाडे लावा आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे (नागेश) शिंदे यांनी दिला आहे.