शिव राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संतोष नवसुपे यांचा आरोप
नगर – दक्षिण लोकसभेचा धक्कादायक निकाल लागलेला आहे. यामध्ये उमेदवारांच्या पराजयामध्ये काही असंतुष्ट नेतृत्वहीन कार्यशून्य लोकांचा हात आहे. यामध्ये वसंत लोढांसारख्या ४२० च्या गुन्ह्यात सहभाग असणारे लोक या पराजय झालेल्या उमेदवाराच्या पाठीशी होते म्हणून जनतेने या उमेदवाराला नाकारले. ४२० च्या गुन्ह्यातील मंडळी ज्या उमेदवाराच्या पाठीशी असतात, त्यांचा पराजय होतो तसेच लोढा यांचे असे म्हणणे आहे की, १९९२ ते १९९८ मध्ये त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्ष असताना शहराचा विकास केला. या ठिकाणी त्यांची कारकीर्द सांगायची तर सक्कर चौक ते लाल टाकी रस्ता फक्त आणि फक्त कागदोपत्री झालेला रस्ता आहे. याचे लाखो रुपये मलिदा यांनी खाल्ला. यामुळे १९९८ नंतर वसंत लोढा व अभय आगरकर यांच्याकडे आजपावतो कुठलेही पद न आल्याने या नैराश्येतून ही मंडळी बिनबुडाचे आरोप करत आहे, असे शिव राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
लोढा व आगरकर हि मंडळी आजपर्यंत विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवारांच्या घरी जाऊन उमेदवारी मागतात. मागील निवडणुकीत यामुळे आगरकरांचा पराभव झालेला आहे. आगरकर आज ज्या विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष आहे, त्या मंदिराचे काम आम्ही लहानपणापासून ते आता ४० ५० वर्षाचे झालो तरी ते काम अद्यापपर्यंत चालू आहे. त्यांना ज्या पद्धतीने या मतदारसंघात नवीन उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे लागतात त्यांनी विशाल गणपती अध्यक्षपदाचा पदभार दुसर्यांना द्यावा. अनेक वर्षापासून वडिलोपार्जित पद त्यांच्याकडे आहे. त्यांना नगरची गुंडगिरी वाढलेली दिसते. पण खरी गुंडगिरी त्यांनी आगरकर मळ्यापासूनच सुरू केलेली आहे. दोन गुंठे जागेच्या व्यवहार होऊन वर्मा या व्यक्तीकडून पुन्हा दोन गुंठे जागा परत मागे घेतली आणि न दिल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली. शेवटी वर्माने न्यायालयात धाव घेतली.
त्यावर आगरकर यांच्यावर फौजदारी दाखल करा, असा आदेश न्यायालयाने दिला. मग नगर शहरातील खरी गुंडगिरी कुठून सुरू झाली, हे सांगायला नवीन नाही. या दोघांनी विनाकारण आरोप करणे सोडावे व शहराचे वातावरण बिघडू नये याची काळजी घ्यावी. शहराला गेली २५ वर्षापासून विकासापासून वंचित ठेवणार्या स्व. अनिल राठोड यांना पण यांनी बोटे मोडून विरोध केला. स्व. दिलीप गांधी यांना याच नगर अर्बन बँकेत खासदारकीला व मंत्रीपदाला यांचाच विरोध होता. हे दोघे कधीच खासदार गांधी यांचा उंबरा चढले नाही. वारंवार जनता तुम्हाला नाकारते आहे. हे लक्षात घेऊन निवडणूक आली की तुम्ही शहराची शांतता भंग करता. आपण ज्येष्ठ आहात याचे भान ठेवा. हेच हिंदूंचे मोर्चे काढतात व हेच भाजपचा उमेदवार पाडून विविध रंगाचे गुलाल उधळण्यास कारण ठरतात. शहराची शांतता जगदीश भोसले यांची हत्या झाल्यापासून भंग झालेली आहे. त्यावेळी तुम्ही अंत्यविधीत म्हटल होते की, खून का बदला खून से लेंगे मग का २५ वर्षे आमदारकी भोगली, सत्ता भोगी पणा तुमच्या रक्तात आहे म्हणून तुम्हाला झोप येत नाही. सिताराम सरडा येथील कॅन्टींगचे इतर गुंड लोकांचे अतिक्रमण काढा मग तुमची पाठ थोपटू. तिथं झुकते माप का देता अशा विविध प्रश्नावर शिव राष्ट्र सेनेकडे उत्तरे आहे पण आपण ज्येष्ठ आहात, शहरात आपल्यामुळेच विविध रंगाचे गुलाल उधळले जात असल्याचा आरोप शिव राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. यावेळी शहर महिला अध्यक्ष अर्चना परकाळे, तालुका अध्यक्ष विशाल जाधव, युवक अध्यक्ष शंभू नवसुपे आदी उपस्थित होते.