अहमदनगर- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, सोनई येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषीकन्याने गुंडेगाव येथे शेतकर्यांना बियाण्यांतील प्रकरांबद्दल कृषिकन्या वैष्णवी हराळ हिने माहिती देऊन मार्गदर्शन केले. कृषिकन्या वैष्णवी हराळ हिने शेतकर्यांना सत्यप्रत बियाणे, मूलभुत बियाणे, पायाभूत बियाणे व प्रमाणित बियाणे यांच्याबदल माहिती देऊन त्यांचे महत्व शेतकर्यांना पटवून दिले. त्याच बरोबर पेरणीला वापरताना प्रमाणित बियाणे वापरावे, कारण प्रमाणित बियाणे हे शास्त्रज्ञांच्या संशोधना खाली तयार होतात आणि त्यातून चांगले पीक भेटते, हेदेखील सांगितले. प्राचार्य डॉ. हरी मोरे, समन्वयक प्रा. अनुप दरंदले कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीमती जगताप, प्रा. श्रीमती जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.